गुरुवार, २३ जून, २०११

सत्ता समीकरण

महाराज: प्रधानजी........... कुठे होतात तुम्ही ? कधी पासून आम्ही आपला इंतजार करत होतो.....आज ११ वाजले तरी आपला दरबारात पत्ता नाही....काय चालू काय आहे या राज्यात?
प्रधानजी: महाराज!! (लवून मुजरा करतो)....माफी असावी........पण महाराज काय एक एक exciting घडामोडी चालू आहेत राज्यात आणि तुम्ही काय इथे दरबारात लोकांची वाट बघत बसलात? थोडा वेळ TV पहा मजेत वेळ निघून जाईल.
महाराज: काय ते उपोषण, सत्याग्रह वगॅरेंबद्दल म्हणत असाल तर सध्या तिकडे लक्ष द्यायची आम्हाला गरज वाटत नाहिये. आमचं कुशल मंत्रीमंडळ आणि कुट्नीती department त्यांची चोख व्यवस्था लावतीलच यात आम्हांला शंका नाही.
प्रधानजी: ते ठीक आहे आहे पण या घोटाळ्यांचं काय? या भ्रष्टाचारावर काय उपाय आहे आपल्याकडे? या प्रश्नावर प्रजा फारच भडकलेली आहे.
महाराज: काय बोलता काय प्रधानजी, तुम्ही काय काल आले का राजकारणात? तुम्हाला माहित आहेच आम्ही एका समितीची स्थापना केली आहे. तिचा अहवाल येइल तेव्हा येवुदे.. आणि दोषींवर कठोर करवाई करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत असं निवेदन सगळीकडे छापुन आलं आहेच. काही चिंता नको.निवड्णुकांना तसा बराच वेळ आहे, जनता तशीही विसराळु आहे.
प्रधानजी: मग आपण एखादं निवेदन प्रकाशित करा किंवा पत्रकार परिषद?
महाराज: प्रधानजी काय वेडे कि काय तुम्ही? सध्या शांत रहाणे चांगलं. तुम्ही आमचा परदेश दौरा आयोजित करा...सगळं सुरळीत होईल निवडणुकीपर्यंत.

प्रधानजी तुम्ही सकाळी सकाळी या काय क्षुल्लक विषयात अडकलात? इथे मी वेगळ्याच चिंतेत होतो. उद्या युवराजांचा बारावीचा निकाल लागेल. आमचं हे रत्न म्हण्जे आनंदच आहे....मुश्कीलीने ५०% तक्के मिळाले तरी खुप झाले.
प्रधानजी: यात चिंता करण्यासारखं काय आहे?
महाराज: महाराणींना त्याला Engineer बनवायचे मनात आहे. problem झाला आहे तो त्या CET मुळे, CET मधे हा किती टक्के मिळवणार? आणि कसा Engineer बनणार?
प्रधानजी: महाराज,आपली काळजी व्यर्थ आहे....आपल्या मंत्र्यांपैकी अनेकांची मोठी मोठी इंजिनीरिंग colleges
सगळीकडे पसरली आहेत. CET वगेरे सगळं झूट आहे, तुम्ही फक्त नाव सांगा महाराज....युवराजाना तिकडे admission
मिळालीच म्हणून समजा.. नाहीतरी management seats भरणार तरी कश्या...? आणि आपले मंत्री तुमचं काम करणार नाहीत काय? तात्पर्य काळजी सोडा....
महाराज: आरे सांगता काय प्रधानजी...म्हणजे चिंताच मिटली. बघा सगळे प्रश्न कसे हळूहळू सुटत आहेत....आता हेच पहा ना उपोषणे, भ्रष्टाचार इतकाच काय आमचेच अनेक मंत्री जेल मध्ये आहेत. आमचे काही नुकसान?
प्रधानजी: नुकसान नाही असं कसं म्हणता ?
महाराज: परवाच ४ राज्यांच्या निवडणुका झाल्या...त्याच्या निकालावरून तरी आमचं काही नुकसान झाल्याचं आम्हाला तरी दिसत नाहीये.
सत्ता टिकणे महत्वाचे...दर ५ वर्षांनी निवडणुका येतात...पहिली २ वर्ष अशीच जातात...मधल्या २ वर्षात काही तरी केल्याचे दाखवायचे...आणि शेवटच्या पाचव्या वर्षात पुढच्या निवडणुकीची धोरणे आणि जनकल्याण याद्वारे काहीतरी केल्याचा आव आणायचा!! पहिल्या ३ वर्षांचे जनतेच्या काही लक्षात नसते... शेवटच्या २ वर्षात आम्ही काहीही वाईट न होण्याची खबरदारी घेतो..पुढच्या निवडणुकीत सत्ता पक्की असं समीकरणच आहे.. आणि मौनाचे पालन महत्वाचे
मौनात फार शक्ती आहे असं म्हणतात त्याचा प्रत्यय येतो आहे.

मौनं सर्वार्थ साधनं!!

प्रधानजी: वा वा क्या बात कहि है? आनंद आहे.....
महाराज कि जय!!! मुजरा.......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा